नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांना काल एका व्यक्तीने रोड शो दरम्यान श्रीमुखात भडकावली. दिल्लीतील मोती नगर भागामध्ये झालेल्या “आप’च्या रोड शो दरम्यान हा प्रकार घडला होता. त्यानंतर आज अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत या घटनेवर प्रतिक्रिया देताना हा हल्ला माझ्यावर झालेला नसून, दिल्लीच्या जनादेशावर झालेला असल्याचे म्हंटले आहे.
मागील पाच वर्षात ही ९ वी घटना असून, मोदी यांच्या विरोधात जो बोलेल त्यांना देशात माफ केले जाणार नाही असा संदेश असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी यावेळी सांगितले. तसेच देशात हुकूमशाही असल्याचा आरोप त्यांनी केला. पुढे देशात दिल्लीचे मुख्यमंत्री एकमेव असे आहेत ज्यांची सुरक्षा ही विरोधी पक्ष म्हणजे भाजपकडे आल्याचे सांगत, अरविंद केजरीवाल यांनी भारताच्या इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारचे हल्ले झाले आहेत, जेवढे हल्ले आपल्यावर झाले असल्याचे म्हंटले.
Delhi CM: This was 9th attack on me in last 5 yrs & 5th attack after becoming CM. I don't think in India's history there has been such attacks on any CM. In this country Delhi CM is the only only CM whose security's responsibility is in the hands of opposition party that is BJP. pic.twitter.com/jPwGTuroDY
— ANI (@ANI) May 5, 2019
Delhi CM Arvind Kejriwal: A Chief Minister was attacked and the Central govt says, 'didn't receive the complaint, unable to move ahead with further proceedings, the PM should resign over it. It's not an attack on Arvind Kejriwal, it is an attack on Delhi's mandate. pic.twitter.com/RsUlRFhlVn
— ANI (@ANI) May 5, 2019