नवी दिल्ली, दि. 18 – देशातील सर्वात मोठा वाद मिटविण्यासाठी सुप्रीम कोर्टाने एक मध्यस्थ समिती नेमली होती. या समितीने गुरुवारी आपला अहवाल कोर्टाकडे सोपवला आहे. मध्यस्थ समितीचे अध्यक्ष न्या. कलीफुल्ला यांनी सुप्रीम कोर्टाकडे आपला अहवाल सोपवला. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधिशांनी याप्रकरणी पुढील सुनावणीसाठी 2 ऑगस्ट ही तारीख दिली. तसेच त्यांना मध्यस्थ समितीने 31 जुलैपर्यंत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल देण्यास सांगितले आहे.
मध्यस्थ समितीने आपला अहवाल सोपवल्यानंतर सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली 5 न्यायाधिशांच्या खंडपीठाने सांगितले की, याप्रकरणात आता सुनावणीची गरज आहे किंवा नाही, यावर आता 2 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. तसेच 2 ऑगस्टपासून अयोध्याप्रकरणी दररोज सुनावणी घेण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
अयोध्येतील जमिनीच्या मालकी हक्कावरून सुप्रीम कोर्टाने गुरूवारी 18 जुलैला मध्यस्थ समितीच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी सुनावणी सुरू केली. सुप्रीम कोर्टाने समितीची प्रक्रिया पुढेही सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली असून समितीच्या निर्णयावर 1 ऑगस्टला रिपोर्ट मागितलाय. अहवालावर विचार करत भविष्यात काय पाऊल उचलायचे याबाबतचा निर्णय घेण्यासाठी आता पुढची तारीख 2 ऑगस्ट दिली गेलीय. सोबतच सुप्रीम कोर्टानं सांगितले की, अयोध्या मध्यस्थ समितीच्या अहवालामधील माहिती ही गुप्त ठेवली जाईल.