पावसाच्या व्यत्ययामुळे आरक्षित दिवशी खेळवल्या गेलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड या रोमहर्षक उपांत्य सामन्यामध्ये आज भारताचा 18 धावांनी पराभव झाला. विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर बलाढ्य संघांना निस्तेनाबूत केलेल्या भारतीय संघाला आज न्यूझीलंडने उभारलेल्या २४० धावांचे किरकोळ आव्हान पार करण्यात अपयश आलं आहे. न्यूझीलंडने उभारलेल्या २४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बलशाली फलंदाजांचा भरणा असलेला भारतीय संघ २२१ धावांवर निपटल्याने भारताचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.