2 हजार 336 पाणी नमुने तपासण्यात आले; नगर, पारेनर तालुक्यात सर्वाधित गावे
नगर: सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार आग्रही आहे. शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी सरकारकडून कोट्यवधींचा खर्च केला जातो, तरीही शंभर टक्के गावांमध्ये शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्याचे वास्तव चित्र समोर आले आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची तपासणी केल्यानंतर, एप्रिलअखेर 124 गावांतील पाणी नमुने दूषित असल्याचे आढळले. वर्षभरात हाच आकडा एक हजार 336 होता.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नियमितपणे पाणी नमुने तपासले जातात. ज्या गावांमधील पाणी दूषित आहे, त्या ग्रामपंचायतींना सूचना दिल्या जातात. वर्षभरात जिल्हा परिषदेने वीस हजार गावांतील पाणी नमुन्यांची तपासणी केली. त्यातील एक हजार 336 गावांतील पाणी दूषित होते. ज्या गावांतील स्रोतांचे पाणी दूषित आढळले, तेथे पाणी शुद्धीकरणासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व भूजल विभागाकडून दर महिन्यात तपासल्या जाणाऱ्या दूषित पाण्याच्या नमुन्यांची संख्या वाढत आहे. मागील एप्रिल महिन्यात तपासण्यात आलेल्या दोन हजार 645 पाणी नमुन्यांपैकी 124 नमुने दुषित आढळले. या महिन्यात दूषित पाण्याची टक्केवारी 4.69 गेली आहे. काही तालुक्यांत मात्र पाणी तपासणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. नगर व पारनेर तालुक्यात दुषित पाण्याचे प्रमाण जास्त असून या तालुक्यामध्ये अनुक्रमे 34 व 27 गावांना दुषित पाणी पुरवठा होत असल्याचे आढळून आले आहे.
पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांतील पाणी पिण्यास योग्य आहे का, याची नियमित तपासणी केली जाते. पाणी नमुने गोळा करून तपासणी करण्याची जबाबदारी आरोग्य विभागाकडे होती. त्यानंतर मात्र यात बदल करण्यात येऊन पाणी तपासणीची जबाबदारी भूजलकडे देण्यात आली. आरोग्य विभागाकडून अजूनही साधारण दहा टक्के पाणी नमुने तपासणी केली जाते. जलसुरक्षकांमार्फत पाणी नमुने गोळा करून भूजल विभागाच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येतात. एप्रिल महिन्यात 2 हजार 645 पाणी नमुने तपासण्यात आले. यामध्ये 124 पाणी नमुने दूषित आढळले. ज्या पाण्याच्या स्त्रोतातील पाणी दूषित आढळले आहे, तेथील पाणी शुद्धीकरणासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या. ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिले. मात्र, दर महिन्यात नवनव्या गावांमध्ये दूषित पाणी आढळणे सुरूच राहिले. पाण्यातील क्लोरीन सरासरी 33 टक्के असावे, असा नियम आहे.
दूषित पाणी नमुने (कंसात तपासलेले नमुने)
पारनेर : 27 (229), अकोले : 7 (232), नगर : 34 (323), संगमनेर : 6 (160), शेवगाव : 8 (136), पाथर्डी : 12 (380), राहुरी : 6 (74), श्रीगोंदे : 8 (293), कोपरगाव : 3 (84), कर्जत : 8 (214), नेवासे : 3 (110), राहाता : 1 (59), श्रीरामपूर : 0 (51), जामखेड 1 (300).
दूषित पाणीपुरवठा होणारी गावे
पारनेर- वडनेर हवेली, बुगेवाडी, पारनेर, वडगाव हवेली, गांजीभोयरे, रायतळे, वाळवणे, बाबुर्डी, रुईछत्रपती, गुंजाळ, पानोली, पळसे खुर्द, कडूस, पाडळी, भोयरा. अकोले- ब्राम्हणवाडा, केळू, ओतूर, पिपळदारीकळस, बाभुळवाडी. नगर- निमगाव वाघा, देऊळगाव, गुंडेगाव, गुणवडी, खडकी, खंडाळा, बाबुर्डी, घोसपुरी, सारोळा कासार, कोल्हेवाडी, हातवळण, मठपिंप्री, बाळेवाडी. संगमनेर- उंबरी, कोकणगाव, शिवापुर, जोर्वे, बेल्हेवाडी. शेवगाव- आखातवाडी, आव्हाणे बु, जोहरापूर, मजलेशहर, मुंगी, घोटण. पाथर्डी- धामणगाव, आल्हाणवाडी, टाकळीमानुर, सोमठाणे, पारेवाडी, करडवाडी, मेळगाव.राहुरी- पाथरे बु, कोळेवाडी, राहुरी बु, जामखेड- मोहा. श्रीगोंदा- पारगाव, मानगाव, कोथूळ. कोपरगाव- करंजी, सडे, आपेगाव. कर्जत- मिरजगाव, रातेजन, घुमरी, चिलवडी, कानगुडवाडी. नेवासे- टोका, प्रवरासंगम, माळेवाडी, राहाता- हसणापूर.