Contact us
Head Office
Daily Prabhat And Poona Daily News Pvt. Ltd.
303/304, Narayan Peth,
Pune, Maharashtra – 411030
Phone : (020) 24455631, 24456626
email : prabhatadd@gmail.com
Pimpri Office
Pride Plaza, First Floor,
Pimpri Square, Pimpri
Maharashtra – 411018
Phone : 020-27423747
email : pimpriprabhat1@gmail.com
Ahmed Nagar Office
Plot No. 1, Sent Monika Highschool Road,
Savedi, Ahmed Nagar, Maharashtra
Phone : 0241-2324081
email : prabhatnagar@gmail.com
Satara Office
39, Karmaveer Housing Society,
New Radhika Road, Satara
Maharashtra – 415001
Phone : 02162-233241/233341
email : prabhatsatara@gmail.com
Karad Office
Office No. 201, M. R. Complex,
Shanivar Peth, Karad,
Maharashra
email : prabhatsatara@gmail.com
[better-social-counter style=”modern” columns=”4″ colored=”1″ order=”facebook,twitter,instagram,youtube” title=”Stay With Us” show_title=”1″ icon=”” heading_color=”” heading_style=”default” title_link=”” bs-show-desktop=”1″ bs-show-tablet=”1″ bs-show-phone=”1″ css=”” custom-css-class=”” custom-id=””]
प्रति,
पत्रकार बंधू आणि भगिनी
फुरसुंगी – उरुळी देवाची ही गावं पुणे महानगरपालिकेमधून वगळून नवीन नगरपालिका करण्याचा निर्णय नागरिकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन मूठभर जणांच्या फायद्यासाठी आणि राज्य सरकारला सुद्धा चुकीचं चित्र दाखवून घेण्यात आलेला असण्याची शक्यता आहे. मालमत्ता करातून सुटका होईल आणि खूप विकासकामे होतील असा प्रचार करण्यात आल्याने नागरिकांना हा निर्णय आवडल्याचं दिसतंय. परंतु करामध्ये नेमका कितीसा फरक पडेल, त्याबदल्यात महानगरपालिकेमधील किती सुविधांना आणि विकासाला मुकावे लागेल, कचरा डेपोचा प्रश्न, आणि महत्वाचं म्हणजे येणाऱ्या काळात येथील विकास आणि अर्थव्यवस्था बांधकाम क्षेत्रावर अवलंबून असल्याने नवीन नगरपालिकेत UDCPR नुसार मिळणाऱ्या कमी FSI + TDR + Ancillary FSI व इमारतींच्या उंचीवरील बंधन यामुळे येथील शेतकऱ्यांचं एकरी कोट्यवधींचं नुकसान होणार आहे, ही आणि अन्य महत्वाची माहिती आपण आपापल्या वर्तमानपत्रांतून प्राधान्याने, तातडीने नागरिकांपर्यंत पोहोचवल्यास या दोन गावांतील लाखो नागरिक देशोधडीला लागण्यापासून वाचतील. इतर गावांमधून अशीच पालिकेतून वगळण्याची मागणी होऊ नये म्हणूनसुद्धा ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. लगतच्या भागाचा विकास खुंटल्यास किंवा अनिर्बंध झाल्यास पुण्यासारख्या महत्वाच्या शहरावर होणारे वाईट परिणाम टाळण्याकरिता देखील हा चुकीचा निर्णय रोखणं गरजेचं आहे.
आपण याबाबत खरी माहिती आकडेवारीसह प्रसिद्ध करून जनजागृती करावी ही कळकळीची विनंती.
धन्यवाद,
सुज्ञ नागरिक, फुरसुंगी – उरुळी देवाची.