हिंमत्तनगर (गुजरात) – भाजप अध्यक्ष अमित शहा आणि गुजरातमधील काही पोलिस अधिकाऱ्यांना अटक करून युपीए सरकारने आपले गुजरात मधील सरकार बरखास्त करण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथील एका जाहीरसभेत बोलताना केला. देशाचे तुकडे करणारी टोळी विजयी होंणार की राष्ट्रभक्त लोक विजयी होणार याचा निर्णय या निवडणुकीने लागणार आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
देशात सन 2004 ते 2014 या काळात रिमोट कंट्रोलने चालणारे सरकार होते. त्यावेळी दिल्लीत बसणाऱ्यांनी गुजरातच्या हिताला बाधा आणली. गुजरात हे राज्य देशाचा भागच नसल्यासारखी वागणूक त्यावेळी आम्हाला दिली गेली असा आरोपही त्यांनी केला. आमचे काही पोलिस आधिकारी आमचे अमित शहा यांच्या सारखे नेते जेल मध्ये टाकण्यात आले.गुजरातचे सरकार पाडण्यासाठी जे काही करता येणे शक्य होते ते त्यावेळी केले गेले. आपण अशा लोकांना पुन्हा गुजरातचे नुकसान करण्याची संधी द्यायची काय असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला.
माझ्या सारख्या गुजराती चहावाल्याने त्यांना कोर्टात जाऊन जामीन मंजुर करून घेण्याची वेळ आणली म्हणून ते माझ्यावर नाराज आहेत. ते गुजरातचा त्यामुळे अधिक कठोरपणे बदला घेतील असे ते म्हणाले. आता आपण पुन्हा निवडून आलो तर जामीनावर असलेल्या नेत्यांना कारागृहात टाकू असेही त्यांनी नूमूद केले. पण जर ते पुन्हा निवडूून आले तर त्यांचे पहिले लक्ष्य गुजरात हेच असेल हे लक्षात ठेवा असा इशाराहीं त्यांनी दिला. ब्रिटीशांनी भारतीयांच्या विरोधात गोळ्यांचा वापर केला पण आता आमच्यावर कॉंग्रेसचे लोक गालीचा (शिव्यांचा) वापर करीत आहेत असे मोदी यांनी नमूद केले.