नवी दिल्ली – कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावर अद्यापही संभ्रम कायम असून, ते जर राजीनाम्यावर ठाम राहिले तर हंगामी अध्यक्ष बनविण्याचा विचार सुरू करण्यात आला असल्याचे बोलले जाते.
असे बोलले जात आहे की, कॉंग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याला पक्षाचा हंगामी अध्यक्ष बनविला जाऊ शकतो. या हंगामी अध्यक्षाला निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी एक समिती असेल ज्यात कॉंग्रेसच्या मोठया चेहऱ्यांचा समावेश असेल. राहुल यांनी राजीनामा देऊ नये यासाठी कॉंग्रेसमधील दिग्गज मंडळी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. जर राहुल गांधी अध्यक्षपदावर कायम राहण्यास तयार झाले तर पक्षात मोठे बदल होणार नाहीत. लोकसभेत कॉंग्रेसचे नेतृत्व राहुल गांधी यांनी करावे यासाठीही पक्षाचे नेते आग्रह धरत आहेत.