भोपाळ – आतापर्यंत गंगा 30 टक्के शुद्ध झाली आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. मध्य प्रदेशमध्ये एका सभेत गडकरी म्हणाले की, गेल्या वेळी कुंभवेळी मॉरिशसचे पंतप्रधान भारत भेटीवर आले होते. त्यांनी गंगेत उतरण्यास नकार दिला. परंतु आता 30 टक्के गंगा स्वच्छ झाली आहे.
जर असे झाले नाही तर प्रियंका गांधी यांनी गंगेचे पाणी कसे काय प्राशन केले असते? आम्ही तर त्यांना इतक्या सुविधा दिल्या आहेत की आता त्या प्रयागराजहून वाराणसीला जलमार्गाने जाऊ शकतात. तसेच आमच्या सरकारने रस्त्यांसाठी 12 हजार कोटी खर्च केल्याचे गडकरींनी सांगितले या रस्त्यांमुळे भाविकांना गंगोत्री, यमुनोत्री, बद्रिनाथ आणि केदारनाथला दर्शनासाठी जाऊ शकतात. तसेच कुठल्याही ऋतूमध्ये हे रस्ते चांगले राहतील असे ते म्हणाले.