नवी दिल्ली: श्रीलंकेमध्ये रविवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभुमीवर भारतीय तटरक्षक दलाने सागरी गस्त अधिक वाढवली आहे. सागरी गस्तीसाठी अधिक जहाजे आणि विमानांच्या फेऱ्या वाढवण्यात आल्य आहेत. सागरी मार्गांनी कोणतीही देशविघातक व्यक्तींकडून देशामध्ये घुसखोरी होऊ नये यासाठी ही काळजी घेतली जात आहे, असे तटरक्षक दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तटरक्षक दलाची सर्व जहाजे तुतिकोरिन, मंडपाम आणि कारैकाल या सागरी तळांवर तैनात करण्यात आल्या आहेत. श्रीलंकेमधील साखळी बॉम्बस्फोटांच्या बातम्या यायला लागल्याबरोबरच सागरी गस्त वाढवण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.