वर्धा – देश चालवण्यासाठी 56 इंचाची छाती लागते, 56 पक्षांचं गठबंधन नाही, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केला.
महायुतीची महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा आज वर्ध्यात पार पडली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सभेला संबोधित केलं, त्यापूर्वी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी महाआघाडीवर निशाना साधत टीकास्त्र सोडले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, देशातील जनतेला 50 वर्ष एप्रिल फूल बनवल्यानंतर परत तेच करण्यासाठी काँग्रेस पक्ष निघाला आहे. विदर्भात यावेळीसुध्दा सर्व जागा युतीच जिंकणार आणि काँग्रेसचा सुपडा साफ होणार, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.