श्रीगोंदा: श्रीगोंदा शहरातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा या संबंधीचे परिपत्रक नगरपरिषदेने काढले आहे. यामध्ये शहरवासीयांना काही सूचनादेखील करण्यात आल्या आहेत. त्यात प्रामुख्याने नळाला मोटर लावल्याचे निदर्शनास आल्यास संबधीत व्यक्तीचे नळ कनेक्शन बंद करण्याचा इशारा नगरपालिकेने दिला आहे.
शहराला नवीन नळ योजनेवरून पाणीपुरवठा सुरू आहे. दिवसाआड पाणी शहराला पुरवले जाते. मात्र काही ठिकाणी नागरिकांकडून पाण्याचा अपव्यय होताना दिसतो. पाण्याचे महत्व व जपून वापरण्याचे सूचना देणारे परिपत्रक नगरपरिषदेने शहरात वाटले आहे. त्यामध्ये मोटर जोडू नये, नळाला मीटर व तोटी बसवावी, पाणी रस्त्यावर मारू नये, पाणी जपून वापरावे आदी महत्वाच्या सूचना केल्या आहेत.