नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर हल्ला बोल केला आहे. २३ मे ला जनतेच्या न्यायालयात निर्णय होणार ‘चौकीदार ही चोर है’ असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठीमधून निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज वैध ठरवत राहुल गांधी यांना दिलासा दिला आहे.
राफेल करारवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज आपले स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये दिले आहे. यावेळी ‘चौकीदार चोर है’ या विधानावर राहुल गांधींनी खेद व्यक्त केला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान उत्साहामध्ये ते विधान केल्याचे राहुल गांधींनी म्हंटले आहे.
राफेल प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला मोठा झटका देत, पुन्हा सुनावणी होणार असल्याचे म्हटले होते. यावर बोलताना राहुल गांधी यांनी, आता न्यायालयानेही चौकीदारही चोर है, वर शिक्कामोर्तब केले असल्याचे म्हटले होते. याविरोधात भारतीय जनता पक्षाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. यावर आज राहुल गांधी यांनी खेद व्यक्त केला.
23 मई को जनता की अदालत में फैसला होकर रहेगा कि कमलछाप चौकीदार ही चोर है।
न्याय होकर रहेगा।
गरीबों से लूटकर अमीर मित्रों को लाभ देने वाले चौकीदार को सज़ा मिलेगी। #ChowkidarChorHai
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 22, 2019