नवी दिल्ली : ‘मोदी-2′ सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (५ जुलै) लोकसभेमध्ये सादर केला. अन्ने, खते, आणि इंधनावरील सरकारचा खर्च चालू आर्थिक वर्षात 13.32 टक्क्यांनी वाढला असून तो आता 301694 कोटी रूपयांवर गेला आहे.
यात इंधन सबसीडीवर 37 हजार 478 कोटी रूपये इतका खर्च होत आहे.एलपीजी सबसीडीवर 32989 कोटी रूपये इतका खर्च होत आहे. तथापी केरोसिन सबसीडीवर मात्र केवळ 4489 कोटी रूपये इतका खर्च होत आहे. यंदा सरकारच्या अन्न सबसीडीवरील खर्च 7.54 टक्के इतका वाढला असून हा खर्च आता 1 लाख 84 हजार 220 कोटी रूपये इतका झाला आहे.
खतांवरील सबसीडी 14.14 टक्क्यांनी वाढली असून ती आता 70085.70 कोटी इतकी झाली आहे. यात युरिया सबसीडीचीच रक्कम 53629 इतकी आहे. सरकारने मार्च 2018 ते मे 2019 या अवधीत 610 लाख टन खत डीबीटी योजने अंतर्गत विकले आहे.