बशिरहाट – पश्चिम बंगाल मध्ये सत्तारूढ तृणमुल कॉंग्रेस राजकीय दडपशाही करून विरोधकांवर हल्ले चढवत असल्याचा आरोप करीत भारतीय जनता पक्षान आज राज्यभर काळा दिवस पाळला. तसेच 24 उत्तर परगणा जिल्ह्यात आज बारा तासांचा बंद पाळण्यात आला. राज्य सरकारच्या दडपशाहींच्या धोरणाच्या विरोधात आणि राज्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्था निधीचा स्थितीचा निषेध करण्यासाठी भाजपच्यावतीने ठिकठिकाणी मोर्चेही काढण्यात आले.
बशिरहाट जिल्ह्याच्या संदेशखली भागात भाजप आणि तृणमुल कार्यकर्त्यांमध्ये जोरदार संघर्ष झाला होता. तेथील तणावाची स्थिती अद्यापहीं कायम आहे. या ठिकाणी भाजपच्या काही कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली असून यातील आरोपींना त्वरीत अटक करावी या मागणीसाठी भाजपने प्रांत अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चाही काढला होता.