मुंबई – देशभरामध्ये भाजपची ऐतिहासिक सुरू वाटचाल असून, भाजपच्या गोटामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांमध्ये युतीच्या कामगिरीबाबत मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निकालापूर्वी भाकीत करताना युती 40 जागा जिंकेल असा दावा केला होता. निकलांनंतर सेना भाजपच्या युतीने राज्यात लोकसभेच्या 41 जागा जिंकल्यामुळे त्यांचा तो दावा खरा देखील ठरला होता.
याच पार्श्वभूमीवर आता एका नामांकित वृत्तपत्राने घेतलेल्या मुलाखतीत विधानसभा निवडणुकीच्या निकालबाबत प्रश्न विचारले असता फडणवीस यांनी आणखी एक भाकीत केलं असून त्यांनी, राज्यात सेना भाजप युती 220 जागांवर निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी निष्प्रभ ठरणार असल्याचे देखील म्हंटले आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यात युतीला राज्यात 220 जागा मिळणार असल्याचे भाकीत केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.