नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीआधी देशभरात राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. निवडणुकीच्या तीन दिवस आधी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून संकल्पपत्र असे नाव देण्यात आले आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी भरघोस घोषणा करण्यात आल्या आहेत.
प्रत्येक घरात वीज, शौचालय पोहोचवण्याचे आमचे लक्ष्य आहे. शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देणार असून सर्व शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा फायदा मिळणार आहे. याशिवाय ६० वर्षावरील शेतकऱ्यांना पेंशन सुरु करणार असल्याचेही गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. तसेच १ लाखांपर्यंतच्या कृषी कर्जावर ५ वर्षांपर्यंत कोणतंही व्याज नसणार, अशीही घोषणा यावेळी करण्यात आली. कृषी क्षेत्रात २५ लाख कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
BJP releases their manifesto for #LokSabhaElections2019. pic.twitter.com/WI1pVKxIze
— ANI (@ANI) April 8, 2019