पुणे: गेली पाच वर्षे नरेंद्र मोदींचं राज्य आपण बघितलं, मोदींनी सांगितलं होतं उद्योगधंदा वाढवेल, रोजगार देईन. लोकांनी याच आधारावर बहुमत दिलं. निर्णयांची अंमलबजावणी होईल असं वाटलं होतं. पण ही निवडणूकही भाजपला त्याच जुन्या आश्वासनांच्या जोरावर लढावी लागत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार म्हणाले.
तरुण नेतृत्वाची फळी या लोकसभेत उतरवली आहे. त्यापैकीच पार्थ पवार एक आहेत. हे नवे नेतृत्व भविष्यासाठी आपल्या डोळ्यांदेखत उभं करायला हवं. एखादवेळी या तरुणांना ठेच लागेल पण यातूनच ते शिकतील. त्यानंतर येणाऱ्या अनुभवातूनच ते कामे करतील. मावळच्या मतदारांनी बदल घडवायचं ठरवलं आहे, हे माझ्या कानावर आलंय. पार्थ पवार निवडून येतील, विश्वास असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.