मुंबई- आज (सोमवार) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २० वा वर्धापनदिन आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आयोजित सोहळ्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, व राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपवर टीका केली.
‘राज्यात भीषण दुष्काळ आहे, आणि त्याची तीव्रता खूप जास्त आहे. ग्रामीण भागाप्रमाणे शहरांमध्येही दुष्काळाचं सावट पसरलं आहे. राज्यातील जनावरांची परिस्थिती वाईट आहे, असे असताना सरकाराने कोणतीही योग्य उपाययोजना केलेली नाही”. असं यावेळी जयंत पाटील म्हणाले.
राज्यात भीषण दुष्काळ आहे आणि त्याची तीव्रता खूप जास्त आहे. ग्रामीण भागाप्रमाणे शहरांमध्येही दुष्काळाचं सावट पसरलं आहे. राज्यातील जनावरांची परिस्थिती वाईट आहे, असे असताना सरकाराने कोणतीही योग्य उपाययोजना केलेली नाही. – @Jayant_R_Patil #NCPTurns20 #JalDin pic.twitter.com/7dLrqa1bQ3
— NCP (@NCPspeaks) June 10, 2019
दरम्यान, नवाब मलिक म्हणाले कि, राष्ट्रवादी काँग्रेसचा हा स्थापना दिवस पाणी संवर्धनासाठी समर्पित आहे. आज राज्यात पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याची साठवण करण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा. मुंबईकरांनी पाण्याला महत्त्व द्यावे, अशी माझी विनंती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापनेपासून सत्तेत राहिली. मात्र, विरोधकांनी आपल्या नेत्यांवर अकारण चिखलफेक केली. आपले नेते बदनाम कसे होतील हा प्रयत्न विरोधकांनी केला. त्यामुळे त्यांना विजय मिळवता आला. आपण केलेली कामे लोकांना सांगण्यात कमी पडलो म्हणून, आपला पराभव झाला.
भाजपाने लोकांच्या भावना, धार्मिकता आणि राष्ट्रवादाच्या नावावर राजकारण केले. पण लोकासभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या असतात. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्याला प्रचंड मेहनत घ्यायला हवी, आपण खचून जाता कामा नये.
जर हे सावरकर, गोळवलकर, हेगडेवार यांचे विचार पुढे करत असतील तर, आपण फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार पुढे करून ही लढाई लढायला हवी. असं देखील ते म्हणाले.