बारामती – मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपने भोपाळमधून उमेदवारी दिली आहे. त्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. खरतरं भाजप सरकारच जनतेला लागलेलं सुतक असल्याचा घणाघात धनंजय मुंडे यांनी केला आहे.
मुंबईला वाचवताना आमच्या शहीदांनी प्राणांची आहुती दिली असल्याचे सांगत, धनंजय मुंडे यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांना घरचे भेदी असे संबोधत त्यांनी शहीद हेमंत करकरेंबाबत बोलूच नये, असे सुनावले आहे. तसेच भारतीय जनता पक्षावर टीका करत, भाजप हे सगळं सहनच कसं करतं? यांना लाज कशी वाटत नाही? अशा शब्दात त्यांनी विरोध दर्शविला आहे.
मुंबईला वाचवताना आमच्या शहीदांनी प्राणांची आहुती दिली आहे. साध्वी प्रज्ञासिंहसारख्या 'घरच्या भेदीं'नी तर शहीद हेमंत करकरेंबाबत बोलूच नये. भाजप हे सगळं सहनच कसं करतं? यांना लाज कशी वाटत नाही? खरतरं भाजप सरकारच आमच्या जनतेला लागलेलं सुतक आहे.#HemantKarkare
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 19, 2019
दरम्यान, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी एका प्रचारसभेत बोलताना, त्यांनी (हेमंत करकरे) मला चुकीच्या पद्धतीने फसवले होते. मी त्यांना सांगितले होते कि, तुमच्या पूर्ण वंशाचा सर्वनाश होईल. बरोबर सव्वा महिन्याने सुतक लागते. ज्या दिवशी जेलमध्ये गेले होते त्याच दिवशी सुतक सुरु झाले. आणि बरोबर सव्वा महिन्यांनी दहशतवाद्यांनी त्यांना मारले आणि त्याच दिवशी त्यांचा अंत झाला, असे वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले होते.