नवी दिल्ली – पश्चिम बंगाल मधील बरोकपोरे लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार अर्जुनसिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने येत्या 28 मे पर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. त्यांच्यावर निवडणुक काळातील हिंसाचाराबद्दल अनेक गुन्हे तेथे नोंदवण्यात आल्याने त्यांच्यावर कधीही अटकेची कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन हे संरक्षण मिळवले आहे.
त्यांच्या विरोधात फौजदारी स्वरूपाचे एकूण 20 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या सुटीकालीन खंडपीठाने या संबंधात निर्णय देताना म्हटले आहे की याचिकाकर्त्यांना येत्या 28 मे पर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आले असले तरी 28 मे नंतर ते आरपोआप रद्द होईल. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी त्यांच्या क्षेत्रातील संबंधीत न्यायालयात जाऊन जामीनासाठी अर्ज करावा.