पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रालोआच्या उमेदवारासाठी आयोजित प्रचारसभेत महिलांना खास टिप्स दिल्या आहेत. 12 मे रोजी प्रथम मतदान करून नंतरच जेवण बनविण्याच्या कामाला लागा. जर तुमचे पती मतदान करत नसतील तर त्यांना दिवसभर उपवास घडवा, या नितीशकुमार यांच्या वक्तव्याची महिला मतदारांमध्ये चर्चा होत आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान पार पडले. आतापर्यंत जवळपास 342 जागांसाठी मतदान झाले असून अनेक उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएमध्ये बंद झाले आहे. याशिवाय लोकसभा निवडणुकीसाठी अजून मतदानाचे तीन टप्पे बाकी आहेत. हे तीन टप्पे मे महिन्यात 6, 12 आणि 19 तारखेला होणार आहेत.