पुणे – बहुचर्चित भामा आसखेड धरणातून पुण्यात पाणी आणण्याच्या कामास सीआरपीएफ पथकासह प्रचंड पोलिस बंदोबस्तात आज सकाळी सुरू करण्यात आले. दरम्यान, आंदोलक आक्रमक होवू नये यासाठी मध्यरात्री १ वाजता प्रमुख आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांचे मोबाइल जप्त केले, अशी प्राथमिक माहिती मिळते आहे.
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी योग्य पुनर्वसनाच्या मोबदल्यासाठी 7 मार्च पासून हे काम बंद पडले होते. मागील आठवड्यात 10 मे रोजी ते पुन्हा सुरू केले जाणार होते. मात्र, पुरेसा बंदोबस्त मिळत नसल्याने अखेर सीआरपीएफच्या तुकड्या मागवून काम सुरू करण्यात आले आहे.