जामखेड: जामखेड तालुक्यातील हळगाव, आघी व बोर्ले या तीन गावातील 40 आपत्तीग्रस्तांना बारामती ऍग्रोच्यावतीने शुक्रवारी (दि.7) जीवनावश्यक वस्तूंच्या 40 किटचे वाटप करण्यात आले.
जामखेड तालुक्यातील हळगाव, आघी, बोर्ले, नान्नज या भागात मंगळवारी चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. यात नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. दरम्यान आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी जामखेड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमांतून बारामती ऍग्रोच्यावतीने रोहित पवार यांनी तातडीने बारामतीची यंत्रणा कामाला लावत आपत्तीग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू पाठवण्याची व्यवस्था केली. त्यानुसार आज शुक्रवारी बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, राष्ट्रवादीचे नेते मधुकर राळेभात, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे व त्यांच्या टीमने हळगाव आघी व बोर्ले गावाला भेट देत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
हळगावमधील शिवाजी ढवळे, एकनाथ तांबे, नानासाहेब ढवळे, सुरेश ढवळे, बापुराव वाघमोडे, काशीनाथ ढवळे, गोरख काळे, अविनाश ढवळे तसेच आघी गावातील रज्जाक अली शेख, मोहन बोराटे, सदाशिव बोराटे, हनुमंत तेरकर, बुवासाहेब इंगळे, द्वारकाबाई पुढाईत, राजेंद्र पुढाईत, रमेश चव्हाण, राजेंद्र गावडे, सागर गावडे, गणपत माने, कल्याण इंगळे तसेच बोर्ले गावातील मच्छिंद्र चव्हाण, रवींद्र चव्हाण, रावसाहेब काकडे, नंदकुमार काकडे, जयसिंग येवले, महावीर येवले, पांडूरंग फडतरे, प्रकाश काकडे, पांडूरंग काकडे, रामभाऊ चव्हाण, रमेश काकडे, पांडूरंग काकडे, चंद्रकांत काकडे, भाऊसाहेब ढेरे, विजूबाई अडागळे या आपत्तीग्रस्तांना नवे कपडे, गहू, तांदूळ व साखर या वस्तुंच्या 40 किटचे बारामती ऍग्रोच्या माध्यमांतून रोहित पवार यांच्या टिमकडून मदत करण्यात आली. यावेळी लतिफ शेख, अरविंद मंडलिक, पाडळीचे सरपंच राजेंद्र पवार, नरेंद्र जाधव, प्रा. लक्ष्मण ढेपे, उमर कुरेशी, विश्वनाथ राऊत, प्रदीप पाटील, मारूती करगळ, भाऊसाहेब ढवळे, विजय धुमाळ, शिवाजी ढवळे, दयानंद कथले, रामदास शिंदे, विठ्ठल ढवळे उपस्थित होते.