नवी दिल्ली – रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात कपात केल्यामुळे रिऍल्टी क्षेत्रातील मंदी कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र, बॅंकांनी घरासाठीचा कर्ज दरात दरात घट करण्याची गरज आहे असे क्रेडाईचे अध्यक्ष सतीश मगर यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की रिझर्व्ह बॅंकेने रिऍल्टी क्षेत्रासाठी सकारात्मक निर्णय घेतला आहे बॅंकांनीही याकामी पुढाकार घेण्याची गरज आहे.
नॅरडेकोचे अध्यक्ष निरंजन हिरचंदानी यांनी सांगितले की, केवळ व्याजदरात कपात करून उपयोग नाही तर त्यासाठी भांडवल सुलभता वाढविण्याची गरज आहे.
मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी मिहीर व्होरा यांनी सांगितले की, एनबीएफसी आणि घरासाठी कर्ज देणाऱ्या संस्था समोरील भांडवल असुलभतेचा प्रश्न सोडविल्याशिवाय या व्याजदर कपातील अर्थ राहणार नाही.
पॅरेडिम रिऍल्टीचे व्वस्थापकीय संचालक पार्थ मेहता म्हणाले की, उच्च बेरोजगारी दर, कमी होत असलेला जीडीपी दर पाहता व्याजदर कपात गरजेची होती.
पोद्दार हाउसिंग अँड डेव्हलपमेंटचे व्यवस्थापकीय संचालक रोहित पोद्दार म्हणाले की, सलग दोन कपातीनंतर या क्षेत्रामध्ये भांडवल सुलभतेत थोडासा सुधार झाला आहे.
नाईट फ्रॅंक इंडियाचे अध्यक्ष शिशिर बैजल म्हणाले की, रोखीची कमी असलेल्या एनबीएफसीना निश्चितपणे भांडवलाच्या प्रवाहातून लाभ मिळेल, ज्यामुळे विकासक तसेच घर खरेदीदारांना फायदा होईल.
एकता वर्ल्डचे अध्यक्ष अशोक मोहनानी यानी सांगितले की, सरकार आणि नियामकांनी अनेक अर्थपूर्ण हस्तक्षेप केले आहेत, ज्याने घर खरेदीदारांमध्ये खरेदी करण्याच्या भावनेला सकारात्मक चालना दिली आहे. अंतरिम अर्थसंकल्पप्रमाणे कमी ईएमआय, कमी जीएसटी, मध्यमवर्गासाठी रु 6.5 लाखपर्यंत उत्पन्नासाठी कर सवलत हे सर्व रिअल इस्टेटला विक्रीसाठी चालना देतील, असे त्यांनी सांगितले.