जालना – जालन्यातील भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
आपण कधीच काँग्रेसचे समर्थक नसल्याचे सांगत, फक्त आणि फक्त रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठीच यावेळेस काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराला आपण जाहीर समर्थन करणार असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांना शिव्या देणाऱ्या रावसाहेब दानवे यांना कोणत्याही परिस्थिती मध्ये पराभूत करणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले.