नवी दिल्ली – रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमिनीच्या वादावर आज सुनावणी झाली. या दरम्यान या वादातून तोडगा काढण्यासाठी आम्ही मध्यस्थांची समिती नेमली आहे. या समितीने आपला अहवाल सादर करावा अन्यथा २५ जुलैपासून सुनावणीला सुरुवात होईल, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
Hearing in SC on plea for early hearing on Ayodhya land dispute case: Supreme Court asks the mediation panel to submit a detailed report by July 25, https://t.co/eKR8G7Lj5v
— ANI (@ANI) July 11, 2019
मध्यस्थ नेमण्याचा जो निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला होता. मात्र मध्यस्थांच्या समितीकडून या प्रश्नावर जो तोडगा काढला होता त्याने कुणाचेही समाधान झालेले नाही, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले होते. मात्र आम्ही मध्यस्थांच्या समितीने अहवाल देण्याची १८ जुलैपर्यंत वाट पाहू अन्यथा २५ जुलैपासून सुनावणी घेऊ असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
दरम्यान, माजी न्यायाधीश एफएम कलीफुल्ला, धर्मगुरु श्रीश्री रविशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पंचु यांना मध्यस्थी म्हणून नियुक्त करण्यात आले.