आसाम – गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आसाममधील पूरस्थिती गंभीर बनली आहे. पूराचा फटका 25 जिल्ह्यांना बसला असून पुरामुळे तब्बल 14 लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे. दरम्यान, यावेळी काझीरंगा भागातील एका पूरग्रस्त घरात एक बंगाल वाघ सापडला आहे. सध्या घटनास्थळी फॉरेस्ट अधिकारी पोहचले आहे.
Assam: A Bengal Tiger found sitting on a bed in a house in flood hit Harmati area of Kaziranga. Forest officials have reached the spot. #AssamFloods pic.twitter.com/Sv0wFhH8Ke
— ANI (@ANI) July 18, 2019
पुरामुळे आसाममधील एकूण 2, 168 गावे पाण्याखाली गेली आहेत. तर 51,752 हेक्टर जमिनीवरील शेतीचे नुकसान झाले आहे.