मुंबई- आगामी विधानसभा निवडणुच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षाची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसचे पदाधिकारी आणि इतर नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न रंगू लागले आहेत.
‘देवेंद्र फडणवीस हे सध्या फोडाफोडीचं राजकारण करत असून, काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांना ते फोन करून भाजपात येण्याचे आमंत्रण देत आहे’. असा आरोप अशोक चव्हाण यांनी यावेळी केला होता.
मात्र, अशोक चव्हाणांच्या या आरोपाला गिरीश महाजनांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ‘आम्ही लोक फोडण्याचं काम नाही, पण जे लोक आमच्याकडे येत आहेत, त्यांना घेण्याचं काम आम्ही करतोय’.असा दावा महाजनांनी केला.
अशोक चव्हाणांबरोबर रात्रंदिवस फिरणारे आम्हाला घ्या म्हणून फोन करत आहेत. याची यादी मी अशोक चव्हाणांना सांगितली तर त्यांच्यासोबत फिरणारे देखील त्यांची साथ सोडून देतील. मात्र, आता मी त्यांची नाव उघडणार नाही, असं देखील यावेळी गिरीश महाजन म्हणाले.