“हे मन बावरे’मध्ये दुर्गाबाईंना सिद्धार्थच्या आयुष्यातून अनुश्री दीक्षितला कायमचे दूर करायचे आहे. त्यासाठी त्यांनी सिद्धार्थला मनवण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्यांचे न ऐकता तो घर सोडून निघून गेला. आता दुर्गाबाईंनी सिद्धार्थला पाठिंबा देण्याचे नाटक सुरू केले आहे. अनुश्रीसमोर त्या विचित्र अट घालणार आहेत. ही अट अनुश्री कधीच मान्य करणार नाही, हे त्यांनाही माहिती आहे. पण अनुश्रीला फेरविचार करण्याची संधी मिळाली आहे. आता यातून अनुश्री कसा मार्ग काढते आणि सिद्धार्थला या सर्व घडामोडींची माहिती मिळते का, हे लवकरच समजेल.