नवी दिल्ली – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याला देशभक्त ठरवल्याने भाजपच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. या वक्तव्यांवर आता भाजप अध्यक्ष अमित शहा यांनीही नाराजी दर्शवली आहे. मागील दोन दिवसांपासून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, अनंतकुमार हेगडे आणि नलीन कटील यांचे विधान त्यांचे वैयक्तिक मत असून या वक्तव्याचा पक्षाशी काहीही संबंध नसल्याचे अमित शहा यांनी ट्विटरवरून म्हंटले आहे. तसेच याप्रकरणी संबंधित नेत्यांना जाब विचारला जाईल, असे शहा यांनी सांगितले आहे.
अमित शहा म्हणाले कि, अनुशासन समिती या तीनही नेत्यांकडे स्पष्टीकरण मागणार आहे. आणि १० दिवसात हा अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले, संबंधित भाजप नेत्यांनी त्यांचे विधान मागे घेतले आहे. आणि माफीही मागितली आहे. तरीही पक्षाच्या प्रतिमा आणि विचारधारेविरुद्ध असल्याने या विधानांचा भाजप गांभीर्याने विचार करेल, असे अमित शहा यांनी सांगितले.
इन लोगों ने अपने बयान वापिस लिए हैं और माफ़ी भी मांगी है। फिर भी सार्वजनिक जीवन तथा भारतीय जनता पार्टी की गरिमा और विचारधारा के विपरीत इन बयानों को पार्टी ने गंभीरता से लेकर तीनों बयानों को अनुशासन समिति को भेजने का निर्णय किया है।
— Amit Shah (Modi Ka Parivar) (@AmitShah) May 17, 2019
दरम्यान, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसे यांना देशभक्त म्हणाले होते. तर अनंतकुमार हेगडे यांनी या विधानाला समर्थन दिले होते.