अकोला – बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबरोबरील संभाव्य आघाडी शक्यता मावळली असल्याची माहिती दिली आहे. काँग्रेसला आम्ही २२ जागांचा प्रस्ताव दिला होता. परंतु तो त्यांनी मान्य केला नाही. येत्या १५ तारखेला राज्यातील सर्व ४८ जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. तसेच आपली लढाई भाजप आणि शिवसेनेविरुद्ध असून राजू शेट्टींशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदार संघातून प्रकाश आंबेडकर निवडणूक लढविणार आहेत. याबाबतची घोषणा स्वतः त्यांनी केली आहे. आंबेडकर हे सोलापूर लोकसभा लढणार असल्याने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे मानले जात आहे. गेल्या वर्षभरात सोलापूर जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढली आहे.
Ads