नवी दिल्ली – जोरहाट विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर बेपत्ता झालेल्या हवाईदलाच्या अपघातग्रस्त एनएन-32 विमानाचा संपूर्ण सांगाडा गुरूवारी शोध पथकाला हाती लागला. यातील सर्व 13 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
वायुसेनेच्या ट्विटर वर अधिकृतरित्या याबाबत कळवण्यात आले आहे. गुरूवारी शोधपथक अपघातग्रस्त विमानाच्या ढिगाऱ्याजवळ पोहचले होते. या ठिकाणी त्यांना कोणाच्याही मृतदेहाचे अवशेष मिळाले नाही. त्यामुळे या विमान अपघातात सर्व 13 जणांचा मृत्यू झाला असल्याचे कळवण्यात आले आहे.
3 जुन रोजी वायुसेनेच्या एएन-32 विमानाने जोरहाट येथुन उड्डाण केल्यानंतर अवघ्या 35 मिनीटानंतर विमानाचा संपर्क तुटला होता. या विमानात 13 जण होते, ज्यामध्ये 8 क्रू मेंबरचा समावेश होता. हे विमान अरूणाचल प्रदेशातील मेचुका येथे जाणार होते. मेचुका हे ठिकाण भारत-चीन सीमेवरील अरूणाचल प्रदेशाताली सियांग जिल्ह्याचा एक छोटा भाग आहे. या अगोदर मंगळवारी एएन-32 चे काही अवशेष सियांग जिल्ह्यात आढळून आले होते. दुर्घटना घडलेले ठिकाण अत्यंत उंचावर व घनदाट जगंलात असल्याने विमानाच्या संपूर्ण ढिगाऱ्या जवळ पोहचणे आव्हानात्मक होते.
अपघातात प्राण गमावलेले 13 जण पुढील प्रमाणे
विंग कमांडर जी एम चार्ल्स, स्क्वाड्रन लीडर एच विनोद, फ्लाइट लेफ्टनंट आर थापा, फ्लाइट लेफ्टनंट ए तंवर, फ्लाइट लेफ्टनंट एस मोहंती, फ्लाइट लेफ्टनंट एम के गर्ग, वॉरंट ऑफिसर केके मिश्रा, सार्जेंट अनूप कुमार, कोरपोरल शेरीन, लीड एअरक्राफ्ट मॅन एस के सिंह, लीड एअरक्राफ्ट मॅन पंकज, कर्मचारी पुताली आणि राजेश कुमार यांचा अपघातामधील मृतांध्ये समावेश असल्याचे भारतीय वायुसेनेकडून सांगण्यात आले आहे. शोध पथकात वायुसेना, लष्कराच्या जवानांसह गिर्यारोहकांचा देखील समावेश होता.