लखनौ – शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना संबोधित केले. मात्र एकाही प्रश्नाचे उत्तर न दिल्याने अपेक्षाभंग झाला. विकासाबाबत काहीही चर्चा केली नाही. ते अगोदर रेडिओवर मन की बात करायचे काल टीव्हीवर मन की बातचा शेवटचा भाग पार पडला या आशयाचे ट्विट करत अखिलेश यादव यांनी केले.
पत्रकार परिषद सुरू असतानाच मोदी दरवाजे बंद करून पत्रकार परिषद घेत आहेत अशी खोचक प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली होती. आता अखिलेश यादव यांनीही टीका करत मन की बातचा शेवटचा भाग टीव्हीवर पार पडला असे म्हटले आहे. पत्रकार परिषदेत मोदी पहिल्यांदा हजर राहिले खरे मात्र ते टीकेचेच धनी होताना दिसत आहेत.