नवी दिल्ली – कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढावी यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांच्या संघटनांशी बोलताना सांगितले. या संघटनांच्या नेत्यांनी सीतारामन यांच्याशी आगामी अर्थसंकल्पाबाबत चर्चा केली.
अन्नप्रक्रिया उद्योग वाढविणे, मत्स्योद्योग वाढविणे, शेतकऱ्यांना पुरेसे भांडवल उपलब्ध करणे, सिंचन सुविधा वाढविणे त्याचबरोबर कृषी उत्पादनांची निर्यात योग्य वेळी करणे इत्यादी बाबीवर यावेळी विचार झाला. दरम्यान याआधीच बहुतांश शेतकऱ्यांच्या संघटनांनी आपल्या मागण्या एका निवेदनाद्वारे अर्थ मंत्रालयाला याअगोदरच सादर केलेल्या आहेत.