नागपूर – लोकसभा निवडणूक झाल्यानंतर चोरीचा तपास होईल आणि चौकीदार तुरुंगामध्ये असेल, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केली. ते एका प्रचारसभेत बोलत होते.
राहुल गांधी म्हणाले कि, कोणत्याही गरीबाच्या घराबाहेर चौकीदार नसतो. परंतु, अंबानींच्या घराबाहेर हजार चौकीदार असतात. तसेच ते पुढे म्हणाले, कुठलीही लहान-सहन चोरी झाली नसून निवडणुकीनंतर याचा तपास होईल आणि चौकीदार तुरुंगात असेल. जेलच्याबाहेर दुसरे चौकीदार असतात. यावेळी गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना राफेल करारातील भ्रष्टाचार माहिती असल्याचा दावाही राहुल गांधी यांनी केला.