नवी दिल्ली: १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली होती. दरम्यान या हल्ल्यात सामील असलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या जवळपास सर्वच दहशतवाद्यांना पुसून टाकले असल्याचे, लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लों यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या कारवाईत आतापर्यंत 41 दहशतवादी ठार केले असून, त्यातील जैश-ए-मोहम्मदचे 25 दहशतवादी होते. तर, यामध्ये 13 पाकिस्तानी नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यावर्षी आतापर्यंत 69 दहशतवादी ठार केले असल्याचे ढिल्लों यांनी म्हंटले आहे.
केजेएस ढिल्लों म्हणाले की, सैन्याच्या या कारवाईनंतर जैश-ए-मोहम्मदचा कमांडर बनण्यासाठी एकही दहशतवादी तयार होत नसल्याने, त्यांच्या मध्ये सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
KJS Dhillon, GOC 15 Corps: Total 69 terrorists have been killed and 12 have been apprehended this year. Post Pulwama 41 terrorists have been killed and out of them 25 belonged to Jaish-e-Mohammed, 13 of them were Pakistanis. pic.twitter.com/IYkBLXs1TR
— ANI (@ANI) April 24, 2019