बीड: वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. निवडणुकांनंतर राष्ट्रवादी पुन्हा भाजपाला पाठिंबा देईल त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका. कारण, निवडणुकांपूर्वी ते धर्मनिरपेक्ष असतात. पण, निवडणुका झाल्यानंतर ते धर्मनिरपेक्ष नसतात, अशी टीका आंबेडकर यांनी केली आहे.
राष्ट्रवादीला मतदान केलं, तर निवडणुकांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपावासी होईल. त्यामुळे निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादीला प्रश्न विचारा की, का तुम्ही भाजपाला पाठिंबा दिला होता. माझ्या मुस्लीम बांधवांनो राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणुकांपूर्वी धर्मनिरपेक्ष पार्टी असते. तर, निवडणुकांनंतर सेक्युलर पक्षांसोबत आपली तडजोड करतात. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले ते बीड येथील सभेला संबोधित करत होते.