मुंबई: लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार फटका बसला. आता काँग्रेस वंचित आघाडीसोबत विधानसभा निवडणुकीत युती करणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबत भाष्य केले.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत आमचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. काँग्रेसच्या ऑफरवर आम्ही आमच्या पक्षाच्या बैठकीत विचारमंथन करू. त्यानंतर आमची या आघाडीबाबतची भूमिका जाहीर करू. पण आम्ही आमचा फायदा असणाराच निर्णय घेऊ, असे प्रकाश आंबेडकर याणी स्पष्ट केले आहे.
तसेच काँग्रेसने वंचित आघाडीवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला होता. याबाबत काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी, कारण आमच्या आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले