आमदार संग्राम जगतात : शिवसेनेत अंतर्गत कुरघोड्या सुरू
नगर – शिवसेनेत अंतर्गत कुरघोड्या सुरू झाल्या असून, कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. त्यामुळे माझ्या नावाची भीती घालून सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात येत आहे. तो पक्ष विखुरला आहे. त्याच्या एकजुटीसाठी माझ्या नावाचा वापर केला जात असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी माध्यामांशी बोलतांना म्हटले आहे.
गेल्या दोन-चार दिवसापूर्वी सोशल मीडियावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी ठाणे येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची एका हॉटेलमध्ये भेट घेऊन चर्चा केली. लोकसभा निवडणुकीत जगताप यांचा पराभव झाला. तसेच राष्ट्रवादीच्या चिंतन बैठकीत दांडी मारली. त्यामुळे जगताप हे शिवसेनेत प्रवेश करतात की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.
याबाबत बोलताना आ. जगताप म्हणाले की, शिवसेनेत अंतर्गत कुरुघोड्या सुरु झाल्या आहेत. त्यांच्यात वाद सुरु झाला आहे. त्यामुळे ते बिनबुडाचे आरोप करत आहेत. राज्यात पाहिले तर सर्वत्रच वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. ऐखादा व्यक्ती कुठे गेला असेल तर त्याची लिंक कुठे ना कुठे जडण्याचा प्रयत्न हे बिगर कामी करत असतात. हे नगरच्या बाबतीतच नाही तर राज्यात असे केले जाते.
नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा असो, अकोले, राहुरी तसेच नगरशहरात असो अशा चर्चा सुरु आहेत. परंतु या बातम्या फक्त सोशल मीडियावर पसरविल्या जातात. मागील विधानसभा, लोकसभा निवडणुकीतही अशी चर्चा सुरु होती. आता पुन्हा विधानसभा निवडणूक येत आहेत तर अशी चर्चा सुरु झाली आहे. ही चर्चा विरोधकच करत असतात. त्यांना काही काम नसल्याने असे उद्योग सुचतात.
विरोधकांना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत संग्राम जगतपच दिसतो. शहरात कुठलीही घटना घडली की त्याची लिंक माझ्याशी जोडून द्यायची असा प्रकार सुरु केला आहे. कारण त्यांच्या पक्षात अंतर्गत वाद सुरू झाल्याने माझ्या नावाची भीती घालून सर्वांना येकत्र करण्याचे काम शिवसेनेने सुरु केले आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचा पक्ष संभाळावा. कारण राष्ट्रवादीचे संघटन लोकसभा झाल्यापासून विधानसभेचे नियोजन सुरू आहे. हे फक्त नगर मध्ये नसून राज्यामध्ये काम सुरू आहे.