मुंबई – मालाडमध्ये मंगळवारच्या मध्यरात्री भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आज आणखी एका सहा महिन्यांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना पिंपरीपाडा परिसरात घडली. आयुष शर्मा असे मृत्य झालेल्या मुलाचे नाव आहे. या दुर्घटनेतील बळींची संख्या 22वर गेली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आयुष ही आपल्या आई-वडिलांसह घरात झोपली होती. मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळली. या दुर्घटनेत शर्मा कुटुंबातील सदस्य मलब्याखाली गाडले गेले. त्यानंतर त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. या घटनेची माहिती मिळताच जवळच्या नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र, या दुर्घटनेत सहा महिन्यांच्या आयुषचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर आयुषचे वडिल उत्तम शर्मा हे जखमी झाले आहेत.