दीर्घकाळाच्या दृष्टिकोनातून मालमत्तेच्या किमतीत होणारी वाढ ही गुंतवणूकदारांना उत्साह वाढवणारी आहे. गेल्या पाच वर्षांपासून मुंबई, दिल्ली, लखनौ, कानपूर, कोची येथील घराच्या किमती सरासरी राहिल्या. एका वर्षात सर्वाधिक वाढ ही कोची शहरात 28.84 टक्के इतकी राहिली. तर कानपूर येथे प्रचंड घसरण झाली. याच काळात दिल्लीत 3.31 टक्के तेजी होती. राष्ट्रीय पातळीवर एका वर्षात घराच्या किमतीत सरासरी 4.66 टक्के वाढ झाली तर तीन वर्षांत घराच्या किंमती 6.72 टक्क्यांनी वाढल्या.
– विधिषा देशपांडे