नवी दिल्ली – भारतीय सैन्याने दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईचे श्रेय राजकारण्यांनी घेतल्याच्या कारणावरून १५० पेक्षा अधिक माजी सैनिकांनी थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. अशातच आता या पत्रात समाविष्ट असलेल्या नावांपैकी काही माजी सैन्य अधिकाऱ्यांनी हे वृत्त खोटे असल्याचे म्हंटले आहे तर काही अधिकाऱ्यांनी आपण या पत्रावर स्वाक्षरी केली असल्याचा स्वीकार केला असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याच पार्शवभूमीवर आता भारताच्या केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रतिक्रिया दिली असून त्या म्हणतात, “सैन्य दलातील दोन माजी अधिकाऱ्यांनी आपण अशा प्रकारच्या पत्रावर स्वाक्षरी केली नसून सैन्य दलातील काही अधिकाऱ्यांनाकडून अशा प्रकारच्या बनावट पत्रावर स्वाक्षरी केली जात असल्याने आपण चिंतीत आहोत अशी माहिती दिली आहे. तसेच राष्ट्रपती भवनाकडून देखील आपल्याकडे अशा प्रकारचे कोणतेही पत्र आले नसल्याचे सांगितले आहे.”
#WATCH Nirmala Sitharaman on purported letter to Pres signed by Armed Forces veterans: 2 senior officers said they haven't given consent,worrying that fake letters being signed by vested groups.Condemnable. Rashtrapati Bhawan has also said that they have not received the letter. pic.twitter.com/VQdWhbgKh5
— ANI (@ANI) April 12, 2019