वाल्हे – मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने वाल्हे परिसरात पेरणीच्या कामांना गती आली आहे. पेरणीसाठी शेतकरी वर्ग बाजारातून बियाण्यांची खरेदी करताना दिसत आहे.
मागील आठवड्यात पेरणीसाठी समाधानकारक पाऊस झाला होता. यामुळे जमिनीमध्ये चांगला ओलावा तयार झाला होता. त्यामुळे बाजरी, मुग, मटकी, तूर, सूर्यफूल, भुईमूग आदी पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. हा पाऊस असाच टिकून रहावा, अशी आशा शेतकरी करीत आहेत.