मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे राज्यात ९-१० सभा घेणार असल्याचे त्यांनी गुडीपाडव्याच्या सभेत म्हटले होते. एकीकडे राज ठाकरे या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असते. तर, दुसरीकडे सध्या निवडणूक आयोगाला एक वेगळाच प्रश्न सतावत आहे.
राज ठाकरेंच्या सभेमुळे सध्या निवडणूक आयोगाची चांगलीच डोके दुखी झाली आहे. कारण, आचारसंहिता काळात सभांचा खर्च हा उमेदवाराच्या नावावर टाकला जातो. मात्र, मनसेचा एकही उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेचा सगळा खर्च कुणाच्या नावावर टाकायचा हा प्रश्न निवडणूक आयोगासमोर निर्माण झाला आहे.