खालापूर : खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची दुःखद घटना समोर आली आहे. तसेच परिसरात अनेक लोक अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. इर्शाळवाडी दुर्घटनेच्या ठिकाणी एनडीआरएफ पथके बचाव कार्य करत आहे. ९८ लोकांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहे तर १० जणांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.
इर्शाळवाडी गावातजाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे बचाव कार्य करण्यात अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. मात्र सध्या या दुर्घटनास्थळी पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे बचावकार्यत अडथळे येत आहेत. पुरुष, महिला, लहान मुले, पाळीव प्राणी यांच्यासह सर्वच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली.
अशात दुर्घटनेची माहिती मिळताच स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री मंत्री उदय सामंत, आणि इतर मंत्रांसह घटना स्थळी पोहचले. यावेळी माध्यमांशी बोलतांना शिंदे म्हणाले, ‘मी मदत व बचावकार्याचा आढावा घेतला आहे. प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचाव कार्य कार्यात अडथळा येत असला तरी हवामानात सुधारणा झाल्यानंतर तात्काळ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल. एनडीआरएफ पथकांकडून बचाव कार्य सुरू आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कॉल करून या घटनेची माहिती घेतली आहे. तसेच काहीही मदत लागली तरी केंद्र सरकार मदत देईल असं आश्वासन अमित शाह यांनी दिल्याचं शिंदे म्हणाले. तसेच आम्ही मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदत देणार आहोत. तसेच जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार आहे. असेही शिंदे यांनी सांगितले आहे.
#इर्शाळवाडीदुर्घटना
मुख्यमंत्री @mieknathshinde हे इर्शाळवाडीत भूस्खलन झालेल्या ठिकाणी चालत जात आहेत. ही अतिशय अवघड पायवाट असून या ठिकाणी अडकलेल्या ग्रामस्थांना मदत पोहोचवून बचावकार्य करण्याबरोबरच जनतेला धीर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः घटनास्थळी जाण्याचा निर्णय घेतला.… pic.twitter.com/0xHSjNWi02— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 20, 2023
दरम्यान, काही वेळा नंतर जनतेला धीर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः घटनास्थळी जाण्याचा निर्णय घेतला. घटनास्थळी जाताना भेटलेल्या इर्शाळवाडीतील ग्रामस्थांची मुख्यमंत्री दे यांनी आस्थेने विचारपूस केली, प्रत्यक्ष परिस्थितीदेखील जाणून घेतली. त्याना धीर देत सरकार सर्वतोपरी सहाय्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.