पेठ – भावडी (ता. आंबेगाव) येथील महिला शेतकरी शालन विष्णू मोरे यांच्या तीन शेळ्यांचा अज्ञात वन्य प्राण्याने सोमवार (दि. 15) पहाटे 5च्या सुमारास हल्ला करून फडशा पाडला आहे. मोरे यांनी याबाबत वनखात्याकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
मोरे यांनी घराशेजारी जनावरांच्या गोठ्यात नेहमीप्रमाणे तीन शेळ्या बांधल्या होत्या. बंदिस्त गोठ्यात पहाटे 5च्या दरम्यान अज्ञात वन्य प्राण्याने हल्ला करून तीन शेळ्या ठार केल्या आहेत. यामध्ये मोरे यांचे 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तलाठी व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पंचनामा केला आहे.