मनंतवाडी (केरळ) – ज्या लोकांनी भाजप प्रणित सरकार केंद्रात निवडून दिले त्या लोकांचाच या सरकारने विश्वासघात केला असा आरोप कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केला आहे. त्या केरळात प्रचार दौऱ्यावर आल्या असून आज येथे बोलताना त्या म्हणाल्या की सारा देशच आपला आहे अशी आपली भावना आहे. सर्वांचीच अशी एकोप्याची भावना असली पाहिजे पण भाजपने गेल्या पाच वर्षात केवळ देशाच्या विभाजनाचाच प्रयत्न केला आहे.
पाच वर्षांपुर्वी जे सरकार या देशात सत्तेवर आले त्या सरकारला लोकांनी मोठ्या विश्वासाने बहुमताने निवडून दिले होते.पण ज्या दिवशी हे सरकार सत्तेवर आले त्या दिवसापासून त्यांनी लोकांचा विश्वास गमावण्याचे काम सुरू केले असे त्या म्हणाल्या. त्यांना ज्यांनी सत्ता दिली त्यांनाच ते विसरले. त्यांना आपली आश्वासने आठवेनाशी झाली. त्यांनी केवळ जुमलेबाजी केली असेही त्या म्हणाल्या.