नगर – नगर मतदार संघासाठी होत असलेल्या मतदान प्रक्रियेत अनेक ठिकाणी त्रुटी आढळल्या आहेत. मतदान यंत्रात बिघाड, ईव्हीएम मशीन बंद पडणे अशा घटना घडल्या आहेत. राहुरी मतदार संघातील शिराळ-चिचोंडी (ता.पाथर्डी) येथील मतदान केंद्रावर गेल्या तीन तासापासून मतदान यंत्रे बंद पडली आहेत. चिचोंडी-शिराळ केंद्रावर फेर मतदान करावे अशी मागणी राष्ट्रवादी कडून करण्यात आली आहे. नगर मतदार संघासाठी होत असलेल्या मतदान प्रक्रियेत अनेक ठिकाणी त्रुटी आढळल्या आहेत. शराळ-चिचोंडी (ता.पाथर्डी) येथील मतदान केंद्रावरील शेकडो मतदारांना मतदान न करताच परतावे लागले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांचे प्रतिनिधी ऍड. प्रसन्न जोशी यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कडे लेखी तक्रार दिली असून शासनाने मतदान यंत्राच्या बिघाडाची गांभीर्याने दाखल घ्यावी, अशी विनंती केली आहे. शिराळ चिचोंडी येथील मतदान केंद्रासाठी नव्याने मतदान यंत्रे नगर मधून निघाली असून तेथे पोहचण्यास गाडीला 6 वाजतील. म्हणून याठिकाणी फेर मतदान घ्यावे. अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आले आहे. शिराळ-चिचोंडी येथे मतदान केंद्रावर मशीन खराब झाले असल्याचे सांगण्यात आले.