नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सुरु झाले आहे. महाराष्ट्र, आसाम, छत्तीसगढ़, पश्चिम बंगाल, जम्मू-कश्मीर, मणिपुर आणि त्रिपुरा मधील ३४ जागांसाठी मतदान होणार आहे. परंतु, मतदानादरम्यान पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावर हिंसा झाल्याचे वृत्त आहे.
पश्चिम बंगालच्या उत्तरेमधील दिनाजपूरस्थित दिगिरपुर येथील मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाला. सुरक्षा दलांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रुंचे गॅस आणि लाठीचार्ज केला. तर रायगंज येथे भाजप उमेदवार देबाश्री प्रत्याशी टीएमसी कार्यकर्त्यांवर मतदान केंद्रे ताब्यात घेण्याचा आरोप लावला आहे.
WB: Security personnel lob tear gas shells and lathi charge locals as they block NH-34 in protest after unknown miscreants allegedly prevented them from casting their votes at Digirpar polling booth in Chopra, in Islampur subdivision of North Dinajpur. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/XukT8B8Aol
— ANI (@ANI) April 18, 2019