राजगुरूनगर- कडूस (ता. खेड) या गावामध्ये बेकायदा जमाव जमवून भांडणे मारामाऱ्या करून दहशत निर्माण करणाऱ्या दहा जणांना खेड शिरूर, मावळ आंबेगाव हवेली पुणे पिंपरी चिंचवड या परिसरातून पुढील सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिली. वैभव दत्तात्रय ढमाले, कानिफनाथ मारुती जाधव, स्वप्नील रामदास तुपे, अतुल पंडित मोढवे, सचिन ताराचंद गारगोटे, नवनाथ रोहिदास गारगोटे, अलीम समशोद्दिन लष्कर, आकाश मच्छिन्द्र नेहेरे, आत्माराम मनोहर बंदावणे, वैभव शिवाजी मुसळे (सर्व रा. कडूस, ता. खेड) अशी तडीपार करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई केली आहे.